आयोडीनयुक्त मीठ,सैंधव/काळे मीठ | आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय.?

आयोडीनयुक्त मीठ म्हणजे काय
515032157

प्रथम आपण ह्या विविध मीठांचे गुण पाहू.

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.

दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते ?

अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात. तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात. तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत. दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरूर मिसळून खावे. म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही. दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते. असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा. गाजर हलवा , तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.

दह्यात आयोडीन-मीठ घातल्यास दह्यातील आवश्यक सर्व जीवाणू मरतात. तेच जर सैंधव/काळे मीठ घातल्यास एकही जीवाणू मरत नाही. ह्यासाठी दही किंवा दही रायते बनवताना सैंधव/काळे मीठच घालावे.

समुद्राचे मीठ भारतात कसे आले?

समुद्री मीठ हे आपल्या खाण्यासाठी नसून ते औद्योगिक कारखान्यांसाठी उपयोगी आहे. इसवी सन १९३० पर्यंत भारतात एकही व्यक्ती समुद्री मीठ खात नव्हती. आहारात सैंधव/काळे मीठच वापरले जायचे. राजस्थान जवळील भागात काही निसर्गनिर्मित सरोवरे आहेत.( उदा. सांबर सरोवर) त्यातील पाण्यापासून बनणारे मीठ हे सर्वश्रेष्ठ मीठ आहे. १९३० पर्यंत सैंधव/काळे मीठ/सांबर मीठ वापरले जायचे. गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह केल्यावर समुद्री मीठ वापरात आले. १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. पाकिस्तानातील कराची, लाहोर भागात मीठाचे डोंगर आहेत. तिथून येणारे सैंधव व काळे मीठ मिळणे अशक्य झाले. तेव्हा पासून मजबूरीने समुद्री मीठ वापरले जाऊ लागले.

भारतात समुद्री मीठाचा वापर सुरु झाला आणि स्वदेशी व परदेशी कंपन्यांच्या डोक्यात स्वतःच्या फायद्याचे विचार सुरू झाले व आयोडीनयुक्त मीठाची संकल्पना रुजवली गेली.

ह्या आयोडीनयुक्त मीठा ने आपल्या आरोग्यात कसा मीठाचा खडा टाकला ते पुढे पाहू.